जकरायाचे नानासाहेब बाबर यांना “बेस्ट अग्रीकल्चर पुरस्कार” प्रदान

वटवटे (ता. मोहोळ) जकराया साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर यांना बेस्ट अग्रीकल्चर पुरस्कार मिळाला असून पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात
हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत बाबर यांना प्रदान करण्यात आला.

जिल्ह्यामध्ये अग्रेसर असलेल्या वटवटे (ता. मोहोळ) जकराया साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर यांना बेस्ट अग्रीकल्चर पुरस्कार मिळाला असून पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार साखर आयुक्त शेखर गायकवाड, भारतीय शुगर डायरेक्टर चारूदत्त देशपांडे, भारतीय शुगर अध्यक्ष विक्रमसिग शिंदे यांच्या हस्ते मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ऍड बी.बी. जाधव, कार्यकारी संचालक सचिन जाधव, संचालक राहुल जाधव यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *