देणेकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून युवक हा बायको व तीन मुलांना घेऊन झाला बेपत्ता..

पंढरपूर व मोहोळ तालुक्यात माजली खळबळ

मोहोळ, धुरंधर न्यूज

देणे पाणी झाल्यामुळे व देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे त्यांना कंटाळून आम्ही घर सोडून जात असल्याबाबत घरामध्ये ठेवलेल्या डायरीमध्ये लिहून ठेवून एक ३३ तरुण हा बायको व त्यांच्या तीन मुलांसह असे एकूण पाच जणांचे कुटुंब दि.१४ ऑगस्ट पूळुजवाडी (ता. पंढरपूर) येथून निघून गेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पाच जण बेपत्ता झाल्याची खबर दि.१९ ऑगस्ट रोजी देण्यात आली असून या घटनेमुळे मोहोळ व पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सुदाम रामचंद्र यादव रा. पुळुजवाडी ता. पंढरपूर हे कुटुंबासमवेत राहत असून त्यांचा मोठा मुलगा तात्यासाहेब सुदाम यादव हा किराणा दुकान चालवतो. दरम्यान १४ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता च्या दरम्यान तात्यासाहेब यादव यांनी चार चाकी गाडीचा चालक चेतन घाडगे याला फोन करून बोलावून घेऊन आम्हाला दवाखान्यात जायचे आहे . मोहोळ येथे सोड ,असे सांगितले. त्या अगोदर त्याने घरामध्ये मोबाईलचे सिमकार्ड काढून ठेवून मला देणे पाणी जास्त झाल्यामुळे तसेच देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे मी त्यांना कंटाळून घर सोडून पत्नी व तीन मुलांना घेऊन निघून जात आहे, असे लिहून डायरीमध्ये ठेवले. त्यानंतर कुटुंबीयांनी तीन दिवस नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र ते घरी नाही आल्याने बेपत्ता तात्यासाहेब यादव यांचे वडील सुदाम यादव यांनी मुलगा तात्यासाहेब यादव (वय ३३), कोमल तात्यासाहेब यादव (वय २९), मुलगी राजनंदिनी (वय ५), मुलगा यशराज (वय ४), तिसरा मुलगा राजकुमार (वय २) असे एकूण पाच जण घरातून निघून मोहोळ येथील एसटी स्टँड येथून दि.१४ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता पासून घरात कोणालाही काहीही नाही सांगता बेपत्ता असल्याबाबतची खबर मोहोळ पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *